आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य ठरते. मुलांवर सुसंस्कार करतांना आपण भारताचा भावी नागरिक घडवत आहोत, असा व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पालकाने ठेवायला हवा ! त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्राच्या उभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्नच ठरतील ! हे लिखाण ह्यासाठी मार्गदर्शक ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
www.balsanskar.blogspot.com